सर्वोच्च न्यायालयाने अॅट्रॉसिटी कायद्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. चार भिंतीच्या आत अनुसूचित जाती किंवा जमातीमधील कुठल्याही व्यक्तीविरोधात काही अपमानजनक बोलल्यास किंवा कुठलाही साक्षीदार ज्या गोष्टीबाबत नसेल, अशी घटना अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकत नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच याचिकाकर्त्यांविरोधात यासंदर्भात अॅट्रॉसिटींतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. ? हितेश वर्मा नावाच्या व्यक्तीवर घरामध्ये अपमानास्पद भाषेचा वापर केल्याचा आरोप उत्तराखंडमधील एका महिलेने केला होता. पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात त्या आधारावर अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणी करताना सांगितले की, सर्व प्रकारचा अपमान आणि धमक्यांचा अंतर्भाव अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये होत नाही. तर ज्यामध्ये पीडित व्यक्तीला समाजासमोर अपमान, शोषण आणि त्रासाचा सामना अशा घटनांचा या कायद्यामध्ये अंतर्भाव होतो. पीडित आणि आरोपींव्यतिरिक्त अन्य व्यक्तींच्या उपस्थितीत या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी गुन्हा घडणे आवश्यक आहे. ? संबंधित घटनेचे पुरावे पाहिल्यास अॅट्रोसिटी कायदा अधिनियमामधील कलम ३(१) (आर) नुसार गुन्हा घडलेला नसल्यामुळे या प्रकरणात दाखल करण्यात आलेले आरोपपत्र रद्द करण्यात येत असल्याचे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती अजय रस्तोगी यांच्या खंडपीठाने सांगितले. अन्य कलमांनुसार आरोपी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून खटला चालवता येऊ शकतो.
ताजी बातमी
सप्टेंबरचा हप्ता विसरा? लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट !, वाचा सविस्तर
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची सूचना समोर आली आहे. योजनेचा पुढील हप्ता मिळवायचा...
शहरात चाललंय काय? भर रस्त्यात कोयत्याने सपासप वार; सात जणांविरोधात गुन्हा दाखल
मित्राला झालेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने सपासप वार केल्याची प्रकार घडला. या प्रकरणी सात जणांविरोधात कोतवाली पोलीस...
मराठा बांधवाना दिलासा ! ओबीसी नेत्यांची ‘ती’ याचिका हायकोर्टाने फेटाळली..
मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबईत मराठा समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी मोठे आंदोलन करण्यात आले....
चर्चेत असलेला विषय
डासांपासून बचावासाठी सोपे घरगुती उपाय
उन्हाळ्यात डासांचे प्रमाण वाढते. डास चावल्यास डेंग्यू, मलेरियासारखे आजार होतात. डासांपासून वाचण्यासाठी अनेक जण क्वाॅईल किंवा लिक्विड रिफिल वापरतात.. मात्र, त्याचा...
डझनभर आमदारांनी पक्ष सोडल्यानंतर भाजपचा मोठा निर्णय; सत्ता टिकवण्यासाठी नवी खेळी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. गेल्या आठवड्यात निवडणूक आयोगानं निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. उत्तर प्रदेशात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे....
Police : भंडारदऱ्यात ‘थर्टी फर्स्ट’ला पोलिसांचा कडक बंदोबस्त
Police : अकोले : निसर्गाचं वरदान लाभलेल्या भंडारदरा (Bhandardara) (ता.अकोले) येथे नववर्षाच्या (New year) स्वागतासाठी होणाऱ्या संभाव्य गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थर्टी फर्स्टला...
भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मंत्र्यांनी मोडलेत, त्यातून थोडं बाजूला येवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, असा...
अहमदनगर राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी आघाडी सरकारचे मंत्री मात्र, स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत.