औरंगाबाद मध्ये मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत घोळ, अगोदर म्हणाले फक्त 3 नंतर सांगितले ५४ रुग्णांची वाढ* जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येतील घोळ मंगळवारी समोर आला. जिल्हातील एकूण रुग्णसंख्या किती, किती रुग्ण बरे होऊन घरी गेले आणि किती रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात २७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सोमवारी माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मात्र, जिल्ह्यात मंगळवारी ३२४ रुग्णांना सुटी देण्यात आल्याची माहिती आधी देण्यात आली. धक्कादायक म्हणजे एकट्या घाटीत १०४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असताना आणि नव्याने ५४ रुग्णांची वाढ झालेली असताना केवळ ३ रुग्णांवरच उपचार सुरू असल्याचे दाखविण्यात आले. हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रुग्णसंख्या नेमकी किती, याचा हिशेब सुरू होता. हा हिशेब लागत नसल्याने अखेर ५४ नव्या रुग्णांची वाढ इतकीच माहिती जिल्हा प्रशासनाने सुधारित म्हणून प्रसिद्धीसाठी दिली. ताळमेळच लागला नाही. त्यामुळे केवळ ५४ नव्या रुग्णांची वाढ झाली, एवढीच माहिती जिल्हा प्रशासनाने रात्री उशिरा दिली. जिल्ह्यात आढळलेल्या नव्या ५४ रुग्णांत ग्रामीण भागातील १७, मनपा हद्दीतील ७ आणि अन्य ३० रुग्णांचा समावेश आहे. अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ३० आणि ग्रामीण भागात ६ रुग्ण आढळलेले आहेत. *रुग्णसंख्या लपविण्याचा प्रयत्न?* जिल्ह्यात २७१ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे सोमवारी माहिती कार्यालयातर्फे सांगण्यात आले. मात्र, जिल्ह्यात मंगळवारी ३२४ रुग्णांना सुटी देण्यात आल्याची माहिती आधी देण्यात आली. धक्कादायक म्हणजे एकट्या घाटीत १०४ पॉझिटिव्ह रुग्ण दाखल असताना आणि नव्याने ५४ रुग्णांची वाढ झालेली असताना केवळ ३ रुग्णांवरच उपचार सुरू असल्याचे दाखविण्यात आले. हा प्रकार निदर्शनास आणून देण्यात आल्यानंतर रात्री उशिरापर्यंत रुग्णसंख्या नेमकी किती, याचा हिशेब सुरू होता. हा हिशेब लागत नसल्याने अखेर ५४ नव्या रुग्णांची वाढ इतकीच माहिती जिल्हा प्रशासनाने सुधारित म्हणून प्रसिद्धीसाठी दिली
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध? शाळा, कॉलेज, लोकलबाबत निर्णय घेऊ; मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा
नागपूर – राज्यात वाढणाऱ्या कोरोना रुग्णसंख्येमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. ओमायक्रॉनचा भारतात शिरकाव झाल्यापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होतेय. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण...
मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन ऊभारण्याची अशोक चव्हाण यांची मागणी
मुंबई-औरंगाबाद-नांदेड-हैद्राबाद बुलेट ट्रेन ऊभारण्याची अशोक चव्हाण यांची मागणी
➖महाराष्ट्रातील बुलेट ट्रेनच्या नियोजनात मुंबई- औरंगाबाद- जालना - नांदेड- हैद्राबाद असा...
एअर इंडिया पी-गेट: शास्त्रीय नर्तकांनी नवीन दाव्यावरून शंकर मिश्रा यांच्यावर जोरदार टीका केली
एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप असलेला शंकर मिश्रा, भरतनाट्यम नृत्यांगना असल्याच्या कारणावरून वृद्ध महिलेने स्वत:वरच...
जगातील सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री’, कंगनाची पुन्हा उद्धव ठाकरेंवर टीका
अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये गुंडाराज सुरू असल्याचे म्हणत तिने उद्धव ठाकरे...





