{ अविनाश देशमुख शेवगाव } 9960051755
याबाबत सविस्तर वृत कि, गेल्या कित्येक दिवसांपासून शेवगाव शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून अनेक भागांत दहा ते बारा दिवसांनी पाणी येत आहे.यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडण्यांची परिस्थिती निर्माण झालेली आहे शेवगाव शहराला होणारा अनियमित पिण्याच्या पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करावा या मागणीसाठी श्रीमती वसुधा सावरकर सौ.राजश्री रसाळ व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव नगरपरिषदेच्या कार्यालयावर महीलांनी व नागरिकांनी हंडा मोर्चा नेत घोषणा बाजी करत नगरपरिषदेचा निषेध केला. शेवगाव शहरात पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, स्वच्छ व वेळेवर पाणी पुरवठा झालाच पाहीजे अशा घोषणा देत नगरपरिषदेच्या कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. या आंदोलनात सौ.सविता भुजबळ, रुपाली तडवळकर, भाविका आर्य,शैला बडधे,बेबीताई मरकड, ज्योती नांगरे,अनिता गुणवंत,गिता नांगरे, मनिषा मरकड, योगिणी पाटील, अंजली भुजबळ, अर्चना जाजू, सीमा बोरूडे, विद्या राजे, संगीत रायकर, अनुराधा क्षिरसागर, अनिता शिंदे, चंद्रप्रभा कांबळे,उमा मानधने, पद्मा भड़के, मनिषा गवळी, सुचित्रा देशपांडे, सुवर्णा दहिवाळकर,रेखा शिंदे,अलका नांगरे,रेखा गवळी, उषा कुलकर्णी,शोभा शिनगारे, द्वारका शिंदे, अर्चना काथवटे, मंगल देसाई,उमा देहाडराय, रूक्मिणी जाधव, वैशाली पन्हाळे,मिना पलोड,रेखा भंडारी, सोनल शेळके, उज्वला डोम,सुर्यकला ढाकणे, प्रमिला काळे,राजश्री बडे आदी महिलांनी महिलांच्या पाण्या बाबतच्या व्यथा नगरपरिषदेच्या प्रशासनासमोर मांडल्या. दहा ते पंधरा दिवसांनी होणा-या या पाणी पुरवठ्याने शहरातील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.शहराला पाणी पुरवठा करणा-या वितरण व्यवस्थेत आपण तातडीने लक्ष घालावे जेणे करुन शहराला किमान चार दिवसाला तरी पाणी पुरवठा होईल याबाबत तातडीने पावले उचलली जावीत. नविन पाणी पुरवठा योजनेचे सत्य नगरपरिषदेने नागरिकांसमोर मांडणे आवश्यक असुन टक्केवारीच्या व मलिद्याच्या खेळात सर्व सामान्य शेवगावकरांना वेठिस धरण्याचे काम किमान नगरपरिषदेच्या प्रशासनाने तरी करू नये. असा इशारा महिलांच्या वतीने देण्यात आला सामान्य शेवगावकर अंत्यत सहनशील असुन त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहु नये.नगरपरिषद प्रशासन जबाबदार असुन या परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे जेणे करुन शहराला किमान चार दिवसाला तरी मुबलक पाणी पुरवठा होईल. तरी येत्या आठ दिवसात या परिस्थितीत आपण तातडीने सुधारणा न केल्यास शहरातील महिला भगिनींच्या नेतृत्वाखाली पुन्हा नगरपरिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. याप्रसंगी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने दिपक कोल्हे, सोनाली वारे,पाणी पुरवठा विभागाचे शरद लांडे यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन दिले.
ताजा कलम
वर्षानुवर्षी शेवगाव शहराला अनियमित होणारा पाणीपुरवठा नवीन रखडलेली पाणी योजना यामुळे सर्वसामान्य शेवगावकर मिटा कुठला आलेला आहे तालुक्याचे लोकप्रतिनिधी शहराचे नेतृत्व केलेले लोक या गंभीर प्रश्नावर मूग गळून गप्प आहेत शेवगाव शहराचा पाणी प्रश्न मिटवा असं कुठल्याही राजकीय कार्यकर्त्याला व नेत्याला वाटत नाही अशी परिस्थिती दिसते वर्षानुवर्षे हे भिजत घोंगडे ठेवण्यात कोणाला सूर्य आनंद वाटतो हेच शेवगाव करांना कळाले नाही
विशेष बाब
काही नथदृष्ट लोक पाण्याच्या प्रश्नात राजकारण करू इच्छिता परंतु शहरातील महिला आता पाणी प्रश्नावर आक्रमक झालेले आहेत आता जे नेतृत्व शहराला पाणी देईल त्याच्याच मागे शेवगाव ची जनता उभी राहील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
अविनाश देशमुख शेवगाव
सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार