
गुरुग्राम, २२ ऑगस्ट
दिल्ली-मुंबई-बडोदा द्रुतगती मार्गावर नूह येथील उमरी गावाजवळ आज तेलाच्या कॅंटरची रोल्स रॉयसला धडक बसून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
या अपघातात टँकरमधील दोन जण जागीच ठार झाले, तर एक टँकरमधील प्रवासी आणि आलिशान कारमध्ये बसलेले चार जण गंभीर जखमी झाले.
जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टँकरला आग लागल्याने कारने लगेचच पेट घेतला, मात्र गाडीतील प्रवासी वेळीच बचावले.
रामप्रीत आणि कुलदीप अशी ठार झालेल्यांची नावे असून दोघेही उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. त्यांचा तिसरा सहकारी गौतम जखमी झाला आहे.
लक्झरी कारमधील तिघांची नावे दिव्या, विकास आणि तस्बीर अशी आहेत, जे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एएसआय अशोक कुमार यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी केली जात असली तरी अद्याप कोणतेही जबाब नोंदवले गेले नाहीत. पोलिसांनी जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.