नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भारतीय जनता पक्षावर खळबळजनक आरोप केला आहे. भाजप आमदार रामाची जागा, विठोबाची जागा लाटत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.नवाब मलिक यांनी राज्यातील मंदिर आणि मशिदीच्या जमीन घोटाळ्याची सविस्तर माहिती पत्रकारपरिषदेत दिली. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जमीन घोटाळा प्रकरणात ११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. नांदेड, औरंगाबाद, बुराहण शाह वली परभणी, जालना, पुणे, बदलापूर, औरंगाबाद, आणि बीडमध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. जमीन घोटाळा झालेल्या दहा देवस्थानांपैकी तीन मुस्लिम आणि सात हिंदू देवस्थाने आहेत.आष्टी मुस्लीम देवस्थानाच्या ३ जागा आणि हिंदू देवस्थानाच्या ७ जागा बेकायदेशीरपणे खालसा करून लाटण्यात आल्या आहेत. यामध्ये हिंदू देवस्थानच्या ३०० एकर जमिनीचा समावेश असून मुस्लीम दर्गा आणि मशिदीच्या २१३ एकर जमिनीचा समावेश आहे. देवस्थानांच्या जमिनीचा मालकी कधीही बदलता येत नाही. पण एकूण ५१३ एकर जमिनीचा हा घोटाळा झालाय, असा दावा नवाब मलिक यांनी केला.भाजप आमदारांनी रामाची जमीनही लाटली; नवाब मलिक यायावेळी नवाब मलिक यांनी आष्टीतील देवस्थान जमीन गैरव्यवहारप्रकरणी सुरेश धस यांच्यावर आरोप केले. या घोटाळ्यात मच्छिंद्र मल्टीस्टेट सोसायटीचा समावेश आहे. या सोसायटीच्या माध्यमातून देवस्थानांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. सोसायटीत असणाऱ्या सदस्यांच्या खात्यात पैसे गेले. यामधून खरेदी खत करण्यात आले. याप्रकरणी राम खाडे यांनी ‘ईडी’कडे केलेल्या तक्रारीत सुरेश धस आणि भीमराव दोंदे यांचे नाव असल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.भाजप आमदारांनी रामाची जमीनही लाटली; नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोपदरम्यान नवाब मलिक यांच्या या आरोपाला सुरेश धस यांनी उत्तर दिलं आहे. माझी संपत्ती चार कोटीची आहे. मलिक यांनी माझी संपत्ती घ्यावी. मला पाच पन्नास द्यावेत म्हणजे माझे कर्ज तरी फिटेल असं सांगतानाच मलिक यांच्यावर मला आता अब्रुनुकसानीचा दावा करावा लागेल, असा इशाराच सुरेश धस यांनी दिला आहे.
ताजी बातमी
ईरानमधील बिघडलेली सुरक्षा व्यवस्था आणि सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाची...
परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत ईरानचा प्रवास टाळण्याचा कडक इशारा दिला असून, जे नागरिक...
राहुरीतील दर्गाह विटंबनेचा निषेध… दोषींवर कठोर कारवाईची मागणी..
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील ऐतिहासिक दर्गाहमध्ये न्यायालयाचा आदेश धुडकावून बेकायदेशीररीत्या घुसखोरी करत दर्गाहची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ...
प्रभाग ३ मधील घटनेबाबत पोलिसांची सखोल चौकशी सुरू..
निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर पाटील
अहिल्यानगर, दि. १५ : अहिल्यानगर महानगरपालिकासार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभाग...
चर्चेत असलेला विषय
भारतीयांना BF.7 विरुद्ध संकरित प्रतिकारशक्ती आहे, प्रवास बंदी प्रभावी नाही: डॉ गुलेरिया
चीनच्या विपरीत, लोकसंख्येच्या संकरित प्रतिकारशक्तीमुळे भारत कोविड महामारीच्या दुसर्या लाटेपासून सुरक्षित आहे, असे एम्सचे माजी संचालक डॉ...
4 दुर्मिळ आजारांसाठी भारतीय औषधांमुळे उपचारांचा खर्च जवळपास 100 पटीने कमी होतो
नवी दिल्ली: सरकारी एजन्सींच्या सहाय्याने, भारतीय औषध कंपन्यांनी केवळ एका वर्षात चार दुर्मिळ आजारांवर औषधे विकसित केली...
नागालँड हत्या: लोकसभेत अमित शहा म्हणाले, ‘वाहन थांबवण्याचा इशारा दिला होता, पळून जाण्याचा प्रयत्न...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी नागालँड गोळीबाराची घटना आणि त्यानंतरच्या हिंसाचारावर लोकसभेला संबोधित केले, ज्यामुळे 14 नागरिक आणि एका सैनिकाचा मृत्यू...
“प्रत्येक 3 मिनिटे, हा एक विनोद आहे”: मंत्री एन सीतारामन यांच्या भेटीवर 10 युनियन्स...
नवी दिल्ली: 10 केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 नोव्हेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी व्हर्च्युअल प्री-बजेट...




