जिल्ह्यात एक लक्ष 45 हजार 622 कोरोनामुक्त, 100 रुग्णांवर उपचार सुरू

485

औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 10 जणांना (मनपा 6, ग्रामीण 4) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 45 हजार 622 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 8 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 49 हजार 345 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 623 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 100 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (07) श्रेय नगर 1, अन्य 6ग्रामीण (01)गंगापूर (01)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here