पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे.
अमरावती: त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्याच्या कथित घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावती मध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा निषेध केला होता. निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या15 ते 20 हजार लोकांच्या या मोर्चाला हिंसक वळण लागले. यावेळी मोर्चा करांनी जयस्थभ चौकातील व शहरातील विविध भागातील 20 ते 22 दुकानांची प्रचंड तोडफोड केली तसेच एका दुचाकीचीही तोडफोड केली.भाजपविरोधात घोषणाबाजीमोर्चा दरम्यान मोर्चेकऱ्यांनी भाजप विरोधात व आरएसएस विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पोलीस व आंदोलक आमने सामने देखील आले होते. तर यात दोन पोलीस कर्मचारी दगडफेक झाल्याने जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, या मुस्लिम मोर्चाला पूर्णपणे गालबोट लागलेराज्य सरकारनं प्रकरणाची दखल घ्यावी: देवेंद्र फडणवीसविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्रिपुरातील कथित घटनांचे भांडवल करून आज अमरावती, नांदेड आणि मालेगाव येथे मोठ्या संख्येने निघालेले मोर्चे आणि त्यातून घडलेले दगडफेक, तोडफोड, हिंसेचे प्रकार अतिशय चिंताजनक आहेत. असं म्हटलंय. राज्य सरकारने त्वरित याची दखल घेऊन परिस्थिती नियंत्रणात राहील, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.
नांदेडमध्येही तोडफोडनांदेडमध्ये आज विविध मुस्लिम संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यावेळी मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या आंदोलकांनी जोरदार नारेबाजी केली. मात्र या बंद दरम्यान शहरात काही ठिकाणी समाज कंटकानी दगडफेक करत तणाव पसरवलाय. देगलूर नाका भागात पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आलीय, तर काही खाजगी वाहने देखील समाज कंटकांनी फोडली आहेत. तर याच समाज कंटकाच्या दगडफेकीत दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. दरम्यान, पोलिसांनी अश्रू धुरांच्या नळकांड्यांचा आणि बळाचा वापर करत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात अफवा पसरून तणाव निर्माण झालाय. पोलिसांनी अटकसत्र राबवण्यास सुरुवात केली असून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.





