श्रीगोंदा,दि.२८ ऑगस्ट,(प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील ताजु येथील दोन मुलांचा श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथील शेततळ्यामधील पाण्यात बुडून मृत्यू झाला. हरी नामदेव कोकरे (वय १५) व विरेंद्र रामा हाके (वय १६) अशी नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त हाेत आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की कर्जत तालुक्यातील ताजू गावाजवळ असणाऱ्या लोखार येथील मावळे वस्तीवरील हरी आणि विरेंद्र हे दोघेजण शेळ्या चारण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव शिवारात गेले होते. याच दरम्यान हरी व विरेंद्र त्यांच्याकडील शेळ्या चरत- चरत थेट शेडगाव शिवारातील भवानी माता मंदिराच्या पुढे आल्या. याठिकाणी पुणे येथील चोपडा यांचे शेततळे आहे. या शेततळ्यामध्ये दुपारी एकच्या सुमारास हरी व विरेंद्र उतरले. त्यांना शेततळ्यातील पाण्याचा अंदाज आला नाही. दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.या परिसरात कोणीच नसल्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. मात्र, सवयीप्रमाणे शेळ्या सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान शेळ्या घरी परतल्या मात्र. मुले आली नाहीत म्हणून घरच्यांनी आजुबाजूच्या परिसरात मुलांना शोधकार्य सुरू केले. याच दरम्यान हरी व विरेंद्रचे कपडे आणि चपला भवानी माता मंदिरासमोर असलेल्या चोपडा यांच्या शेत तळ्याजवळ सापडल्या. यानंतर यातील एक मुलगा पाण्यावर तरंगताना दिसला. यानंतर हरी व विरेंद्र पाण्यात बुडाल्याचे कुटुंबीयांना समजले.
ताजी बातमी
बिहारमध्ये पुन्हा ‘नितीश सरकार’ नितीश कुमारांनी १० व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर बिहार एनडीएने नवीन सरकार स्थापन केले. जदयूचे नेते नितीश कुमार यांनी १०...
अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध, २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती
अहिल्यानगर - अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी विधानसभेच्या मतदार यादीच्या आधारे तयार केलेल्या मतदार याद्या महाराष्ट्र...
राज्य शासनाच्या युवा धोरण समितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड
अहिल्यानगर : राज्य शासनाच्या युवा धोरणसमितीवर आमदार संग्राम जगताप यांची निवड झाली असून शालेय शिक्षण व क्रीडा...
चर्चेत असलेला विषय
हवामान कार्यालयाच्या 4 दिवसांच्या इशाऱ्याने दिल्लीत पावसाने जोरदार हजेरी लावली
नवी दिल्ली: चार दिवसांच्या पावसाने पारा सामान्यपणे नऊ ते दहा अंशांनी खाली घसरेल, असा हवामान खात्याच्या अंदाजानुसार,...
ट्रेन क्रॅश बॉडी लांब ठेवू शकत नाही, एम्बॅल्मिंग मदत करणार नाही, शीर्ष डॉक्टर म्हणतात
नवी दिल्ली: शुक्रवारी ओडिशा रेल्वे दुर्घटनेनंतर 100 हून अधिक मृतदेहांची ओळख पटलेली नाही, भारतातील आतापर्यंतच्या सर्वात प्राणघातक...
हावडा-एनजेपी वंदे भारत एक्स्प्रेस: अज्ञात हल्लेखोरांनी नव्याने सुरू झालेल्या ट्रेनवर दगडफेक केली.
सोमवारी नव्याने सुरू झालेल्या हावडा-एनजेपी वंदे भारत एक्स्प्रेसच्या व्यावसायिक धावण्याच्या दुसऱ्या दिवशी अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. प्रीमियम...
धरण पाणीसाठा(Storage Update)
धरण पाणीसाठा(Storage Update)?☀?⛈???⛈???पर्ज्यन्यमान,विसर्ग,आवक इ.अद्ययावत माहितीदिनांक २६/०८/२०२० सकाळी ६=००वा.
®️=====================®️??????????साठा(दलघफू/टीएमसी/टक्केवारी)…(उपयुक्त साठा)----- अहमदनगर (उत्तर) -----१)भंडारदरा-- ११०००…..९९.६५%२)निळवंडे ---- ७४९२…..९०.०५%३)मुळा ------- २३७०१…..९१.१६%४)आढळा -----...




