Aurangabad | जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 212 कोरोनामुक्त, 147 रुग्णांवर उपचार सुरू

431


औरंगाबाद, दिनांक 24 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्यात आज 18 जणांना (मनपा 06, ग्रामीण 12) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 212 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 17 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 886 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 527 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 147 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (3)
घाटी परिसर 1, मयूर पार्क 1, प्रताप नगर 1

ग्रामीण (14)
गंगापूर 2, खुलताबाद 1, वैजापूर 5, पैठण 6


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here